नवरा बायको जोवर मित्रमैत्रिण किंवा प्रियकर – प्रेयसी असतात तोवर त्यांच्यातील Understanding एका वेगळ्याच Level वर असते. सुख-दु:ख, रुसवे-फुगवे, गैरसमज हे सगळच प्रेमाने सोडवलं जातं. पण अनेकदा लग्न झाल्यावर गोष्टी बदलतात. कधीकाळी प्रियकराचा आवडणारा स्वभाव अचानक आवडेनासा होतो, तर कधीतरी प्रेयसीची असलेली एखादी जुनी सवय अचानकच खटकायला लागते. लग्नानंतर हेच खटके टाळण्यासाठी आणि संसाराची गाडी रुळावर ठेवण्यासाठी दोघांपैकी एकाला तरी म्हणावच लागतं – ‘तू म्हणशील तसं’.