वणवा ही दि. बा. मोकाशी यांच्या ‘वणवा’ या कथासंग्रहातली एक गोष्ट आहे. ही एक रात्री जंगलात लागलेल्या वणव्याची कहाणी आहे. वणवा लागण्यापूर्वीची शांतता, वणवा पेटल्यानंतर जंगलात जनावरांची-माणसांची होणारी धावपळ आणि वणवा विजल्यानंतर जाळून राख झालेल्या जंगलासोबत मनात घर करून बसणारी शांतता! असा एकूण गोष्टीचा आलेख आहे.
एका शांततेकडून दुसऱ्या शांततेपर्यंतचा प्रवास गोष्टीत मांडलेला आहे. कातकरी आदिवासी समाज जो पूर्णपणे जंगलावर अवलंबून असतो त्यांच्या नजरेतून गोष्ट आपल्यापर्यन्त पोहोचते. पर्यावरणाचा होत जाणारा ऱ्हास यावर सुद्धा गोष्टीत भाष्य केलं आहे.