मराठी रंगभूमीवर सध्या नवनवीन प्रयोगांची लाट आली असतानाच, प्रेक्षकांसाठी एक सुखद धक्का देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या नाटकाची जोरदार चर्चा सुरू होती, अखेर त्या नाटकाच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने आणि दिग्गज अभिनेते डॉ. गिरीश ओक तब्बल ३० वर्षांनंतर एकाच नाटकात एकत्र येत असून, या नाटकाचे नाव आहे ‘आता थांबवायचं कसं? (Sukanya Mone & Dr. Girish Oak New Marathi Natak Name)’ ‘कुसुम मनोहर लेले’ मधील त्रिकूट मुहूर्ताच्या निमित्ताने आले एकत्र! या नाटकाच्या मुहूर्ताच्या वेळी एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. ३० वर्षांपूर्वी ‘कुसुम मनोहर लेले’ या अजरामर नाटकातून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे सुकन्या…
Author: मायरंगभूमी टीम
Organised by Artists for Aarey in collaboration with the Warli Adivasi community, the Tarpa Theatre Festival 2026 brings nine plays to Aarey’s amphitheatre and outdoor spaces from May 15 to May 17 — alongside theatre workshops, seed ball making, Warli painting sessions, and conversations.
The cast of ‘Albatya Galbatya’ has released a video highlighting electrical sparking, AC failures and poor backstage facilities at Acharya Pralhad Keshav Atre Rangmandir in Kalyan — even as Dombivli’s Savitribai Phule Natyagruha continues to remain closed for slab repair work.
मराठी संस्कृतीचा कणा असलेल्या रंगभूमीसमोर आता एक नवे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. मुंबई महानगरपालिकेने १ एप्रिल २०२६ पासून नाट्यगृहांच्या भाड्यात केलेल्या सुमारे ₹४,००० पर्यंतच्या वाढीमुळे नाट्यनिर्मात्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नाट्यव्यवसाय संकटात येण्याची भीती नाट्यनिर्मात्यांकडून व्यक्त केली जात आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची धाव या भाडेवाढीला कडाडून विरोध दर्शवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेने पुढाकार घेतला आहे. परिषदेच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांना एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून, ही भाडेवाढ तात्काळ स्थगित करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. निर्मात्यांच्या अडचणी: ‘जीएसटी’चा फास आणि प्रेक्षकांचं नुकसान नाट्यनिर्मात्यांच्या मते, ही भाडेवाढ केवळ अन्यायकारकच नाही, तर अव्यवहार्य देखील आहे. त्यामागची प्रमुख…
मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा एक वेगळ्या आशयाचं, नात्यांच्या गुंतागुंतीला थेट भिडणारं आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणारं नवं नाटक येऊ घातलं आहे — ‘पुढच्या शुक्रवारी सात वाजता’. शीर्षकातच दडलेली उत्कंठा, आणि पोस्टरवरील सुप्रसिद्ध कलाकारांची नावं या नाटकाकडे सध्या रंगभूमीप्रेमींचं विशेष लक्ष वेधून घेत आहेत. सतीश राजवाडे — रंगभूमीवर पुनरागमन! चित्रपट, मालिका आणि वेबविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले सतीश राजवाडे या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा रंगभूमीकडे वळत आहेत. काही वर्षांच्या अनुपस्थितीनंतर त्यांचं हे रंगमंचावरील पुनरागमन असल्याने प्रेक्षकांमधील उत्सुकता स्वाभाविकच आहे. अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रांमध्ये सहजपणे वावरलेले राजवाडे, रंगमंचावर उभे राहिले की एक वेगळाच प्रभाव निर्माण होतो — हे रसिकांना चांगलंच…
मनाच्या गाभाऱ्यात दडलेली रहस्ये, अनपेक्षित वळणे आणि सत्य-भास यांच्यातील पुसट होत जाणारी सीमारेषा… हा थरार आता मराठी प्रेक्षकांना प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे. भ्रम आणि वास्तव यांच्या गुंतागुंतीवर आधारित ‘भुल भुलैय्या’ हे नवंकोरं नाटक लवकरच मराठी रंगभूमीवर पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे, या नाटकाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बेर्डे एका दमदार भूमिकेतून रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. रहस्य आणि मनोरंजनाचा मिलाफ ‘रंगत संगत’ आणि ‘श्री लक्ष्मीनारायण प्रॉडक्शन्स’ यांची निर्मिती असलेल्या या नाटकाची कथा हेमंत एदलाबादकर यांनी लिहिली आहे. नाटकाची रंगावृत्ती, दिग्दर्शन व प्रकाश कुमार सोहोनी यांचे असून, रणजित देसाई व केदार सामंत यांनी या नाटकाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. एखादी…
कदाचित ते साल १९९९ असावं, युवा लेखक आणि दिग्दर्शक संतोष पवार यांच्या ‘यदा कदाचित’ नाटकाने रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. गडकरी रंगायतन, ठाणे येथील नाटकाच्या हाऊसफुल्ल प्रयोगाचा मी साक्षीदार होतो. नवोदित कलाकारांच्या मांदियाळीत एक तुडतुड्या तरुण, वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण स्टेज पायाला भिंगरी लावून कव्हर करत लवचिक अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होता. हशा आणि टाळ्या यांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले होते. त्याचवेळी आमच्या आसनाच्या मागील बाजूकडून त्याची कॉलेजियन मित्रमंडळी ‘व्वा सम्या व्वा’ अशी साद घालत उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन देत होते. नवोदित कलाकारांच्या मांदियाळीत एक तुडतुड्या तरुण, वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण स्टेज पायाला भिंगरी लावून कव्हर करत लवचिक अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होता. तो तरुण…
मराठी रंगभूमीवरील सर्वाधिक काळ चाललेल्या नाटकांपैकी एक असलेल्या ‘ऑल दि बेस्ट’ (All the Best Marathi Natak) या गाजलेल्या नाटकाच्या नवीन टीमचा ३०० वा प्रयोग लवकरच होणार आहे. देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित या नाटकाचा हा महत्त्वाचा टप्पा रविवार, १२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई येथे साजरा केला जाणार आहे. ३३ वर्षांचा अखंड प्रवास: ‘ऑल दि बेस्ट’ची कहाणी ३१ डिसेंबर १९९३ रोजी शिवाजी मंदिर नाट्यगृहातच देवेंद्र पेम यांनी ‘ऑल दि बेस्ट’चा पहिला प्रयोग सादर केला होता. तेव्हापासून नाटकाने एकाहून एक हाउसयुल्ल प्रयोगांचे विक्रम मोडत आपला एक वेगळाच इतिहास निर्माण केला. तेहत्तीस वर्षांनंतरही, २०२६ साली, देवेंद्र पेम…
अनेक दशके इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर सातत्याने विविध पद्धतीची नाटकं देणारे आणि भारतातील हिंग्लिश (हिंदी + इंग्लिश) नाटकांचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध ॲड गुरु, लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेते भरत दाभोळकर (Bharat Dabholkar) प्रथमच मराठी रंगभूमीवर एक आगळे वेगळे नवीन मराठी नाटक (New Marathi Natak) घेऊन एन्ट्री घेत आहेत. त्यांच्या या पदार्पणामुळे नाट्यप्रेमींना आता मराठीतही ‘दाभोळकरी पॅटर्न’ची धम्माल अनुभवायला मिळणार आहे. गाजलेल्या इंग्रजी नाटकाचे मराठी रूप: ‘कॅरी ऑन SPYगिरी’ (Carry On Spying Marathi Adaptation) सध्या इंग्रजी रंगभूमीवर तिसऱ्यांदा दाखल झालेल्या ‘कॅरी ऑन स्पाईंग’ (Carry on Spying) या नाटकाचे मराठी रूपांतर घेऊन भरत दाभोळकर आणि त्यांची टीम सज्ज झाली आहे. ‘कॅरी…
तरुणाई आणि अनुभवाचा अनोखा संगम ‘शंकर जयकिशन’ (Shankar Jaykishan Marathi Natak) या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील तरुण रक्ताचा आणि दिग्गज अनुभवाचा संगम. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक जोडी विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि सुरज पारसनीस (Suraj Parasnis) यांनी या नाटकाची धुरा सांभाळली आहे. त्यांच्या आधुनिक दृष्टीकोनातून मांडलेला हा विषय आणि त्याला शिवानी रांगोळे (Shivani Rangole) सारख्या गुणी अभिनेत्रीची साथ यामुळे हे नाटक तरुणाईलाही नक्कीच आकर्षित करेल. बाप-लेकीचे हळवे नाते आणि मैत्रीची नवी व्याख्या मांडणारे हे नवीन मराठी नाटक (New Marathi Natak) कौटुंबिक मनोरंजनाचे उत्तम उदाहरण ठरणार आहे. ‘भरत जाधव एंटरटेनमेंट’ निर्मित आणि दोन दिग्गज कलाकारांची जुगलबंदी असलेल्या ‘शंकर जयकिशन’ या नाटकाचे…
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीसाठी एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी आहे! मराठी रंगभूमीला विविध स्पर्धा व उपक्रमांमधून सातत्याने नवे आणि प्रतिभावान चेहरे देणाऱ्या राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत यावर्षीपासून प्रथमच ‘राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२५’ आयोजित करण्यात येत आहे. महाविद्यालयीन नाट्यकलाकारांसाठी शासनाने थेट राज्य स्तरावर ही स्पर्धा आयोजित करण्याचा घेतलेला निर्णय कला आणि संस्कृती क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक आणि उत्साहाचे पाऊल मानला जात असून, यामुळे महाविद्यालयीन रंगभूमीला भव्य व्यासपीठ मिळणार आहे. राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२५ महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा स्पर्धेचे वैशिष्ट्य राज्य शासनाची ही स्पर्धा इतर अन्य स्पर्धेपेक्षा अनोखी आहे. सहभागी संघांनी जमा केलेली अनामत…
मराठी रंगभूमीवरील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा! हे या स्पर्धेचं ३५ वं वर्ष! यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. यंदाच्या अंतिम फेरीत स्क्रिप्टीज क्रिएशन्स प्रस्तुत “असेन मी… नसेन मी…” या नाटकाने बाजी मारत रु. ७,५०,०००/- चे प्रथम पारितोषिक पटकावले. ही घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. विभीषण चवरे यांनी केली. या वर्षी स्पर्धेत १० व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर झाले. ६ मे ते १६ मे २०२५ या कालावधीत श्री शिवाजी नाट्य मंदिर, दादर (प), मुंबई येथे रंगलेल्या या अंतिम फेरीस प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रमुख पारितोषिके पुढीलप्रमाणे प्रमुख नाटकांचे पारितोषिक प्रथम पुरस्कार (₹७.५० लाख) – “असेन मी.. नसेन…






![सम्या सम्या मैफिलीत माझ्या — एक रंगतदार मैफल [प्रेक्षक प्रतिक्रिया] samyaa samyaa maifileet majhya](https://myrangabhoomi.com/wp-content/uploads/2026/04/samyaa-samyaa-maifileet-majhya-1536x864.jpg)



![महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा-२०२५’ चे आयोजन — राज्य शासनाच्या वतीने ऐतिहासिक पाऊल! [Updated] Maharashtra Govt. Ekankika Competition 2025](https://myrangabhoomi.com/wp-content/uploads/2025/09/mahanatyaspardha-ekankika-spardha-cover-2-1536x864.jpg)
